Wednesday, April 2, 2008

जगणं सोडलं नाही

आणि आनंद परत मिळाला की जिवनाचा खरा अर्थ कळतो

मी आनंद दिला पण मला आनंद मिळाला नाही,
जिवनाचा अर्थ कळाला नाही
मी कुठेतरी वाचलं
आपण आपल्या प्रेमाला जगात मुक्त सोडावं
परत आलं तर ते आपण स्विकारावं
नाही आलं तर ते आपलं नव्हतंच

पण ते परत आलंच नाही,
मला कधी कोणी माझं वाटलंच नाही

आता मी वाचणं सोडलं
पण जगणं सोडलं नाही
आनंद देणं सोडलं नाही
प्रेम करणं सोडलं नाही
आता जिवनाचा अर्थ कळू लागलाय
मी जवळ गेलो तरी
प्रत्येक माणूस दुर पळू लागलाय

क्षितीजापलीकडे पाहण्याची दृष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता येत.

आपल्या रक्तातच धमक असेल,
तर जगंही जिंकता येत.

मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो
आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं

3 comments:

मोरपीस said...
This comment has been removed by the author.
मोरपीस said...

फ़ॊटो आणि पोस्ट फ़ारच छान आहे.

... said...

hey ur language is good.
yet ur thoughts are random.
it would have been a great fun if u had woven one thought throughtout the poem.
as i feel, ur post contains so many thoughts at a time..
like
"premala jagat mukt sodawa... "
- 1st thought.
"mi jawal gelo.......dur palu laglay".
-2nd thought.
"kshitijapalikade...jag hi jinkata yeta"
- 3rd thought.

if u can explain to me the meaning hiding in ur words then i would feel delighted !!

take no offence.. :)
thanks..